रिपोर्टर
प्रशासनाने घालुन दिलेले नियम पायदळी तुडवत आनेकजन विनाकरण बाहेर फिरताना दिसतात.आशा विनाकारण फिरणारांची रॅपिड अॅंटिजेन टेस्ट करण्याची मागणी साहित्यीक तथा उस्मानाबाद नगरपालीकेचे नगरसेवक युवराज नळे यांनी एका विवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या कोविड १९ ची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणावर रुग्न सापडत आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत, मात्र तरीही विनाकारण बाहेर फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. म्हणून विनाकारण बाहेर फिरणा-यांची सक्तीने रॅपिड अॅंटिजेन टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून बाहेर फिरणा-यांवर काही अंशी पायबंद बसू शकेल.आशी मागणी निवेदनात केली आहे.
0 टिप्पण्या