कोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा दादा कांबळे यांचे नगरपालीकेला निवेदन


उस्मानाबाद-रिपोर्टर 


जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहेत दररोज २० ते २५ लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि नगरपालिकेचे कर्मचारी  अंत्यविधी साठी कपिलधारा  स्मशानभूमी व सार्वजनिक स्मशानभूमीचा वापर करत आहेत त्यामुळे इतर आजारामुळे,नैसर्गिक निधन,अपघाती मृत्यू झालेल्या नातेवाईकांना याच स्मशानभूमी चा वापर करावा लागतो तेथे कोरोना वायरस मुळे  इतरांना कोरोना होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे इतर आजाराने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत बसावे लागते आहे तरी नगरपालिकेने लवकरात लवकर तात्पुरती स्मशानभूमी इतर जागेवर तयार करावी अन्यथा मनसेच्या वतीने नगरपालिकेच्या आवारात प्रतिआत्मक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व नगरपालिका सीईओ यांना दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या