
धारे सरकार बनवले त्यामधीलच मुददे दुर्लक्षीत केले आहेत. शेतक—यांचे प्रश्न आणि महिलांवर होत असलेल्या आन्यया बाबत सरकारने जनतेचा विश्वासघात केला असुन त्याची जानीव सरकारला करूण देण्यासाठी 25 फेब्रूवारी रोजी भजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी भाजपाचे जिल्हाअध्यक्ष नितीन काळे,
जिल्हापरिषद अध्यक्षा अस्मीता कांबळे,व्यंकट गुंड,जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील,नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष अभय इंगळे, गटनेते तथा बांधकाम सभापती युवराज नळे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रात महीलांवरील आणि अल्पवयीन मुलींवर होणारे वाढते अत्यचार तसेच शेतक—यांची भरकटलेली कर्जमाफी या गोष्टी बाबत महाविकास आघाडीने सर्वाचा विश्वासघात केला आहे.ज्या समान किमान कार्यक्रमाच्या अधारे सरकार बनवले त्यामध्येच जनतेला दिलेली अश्वासनं सरकारने पाळली नाहीत त्याची जानीव सरकारला करूण देने गरजेचे आहे.तसेच शेतक—यांना हेक्टरी 8 हजार देण्यात येणारे अनुदान शेतक—यांना वेळेत मिळत नाही.त्याच बरोबर सर्वसाधारण पिकासाठी 25 हजार आणि बागायती पिकासाठी हेक्टरी 50 हजार ही शिवसेनेची मागणी सरकार विसरतय का? आसा प्रश्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला.जिल्हयासह मराठवाडयाच्या हीताचा असणारा वाटरग्रिड प्रकल्प याला महाविकास आघाडीच्या सरकारणे आनलेला आडथाळा हा निषेर्धात आहे.असेही आमदार पाटील म्हणाले.तात्काळ देण्यात येणा—या कर्जमाफीच्या घोषनेची योग्य अंमलबजावनी का होत नाही आशा महत्वाच्या मुदयावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी 25 फेब्रूवारी रोजी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाला संगळयानी मोठया प्रमाणात उपस्थित राहावे असे अवहान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या