रिपोर्टर: कोल्हापूर ,सांगली येथील पूरग्रस्तांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांच्यावतीने लागणारे सर्व संसारोपयोगी साहित्य देवून मदत करण्यात आली.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील ,भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभिराम सुधीर पाटील यांची उपस्थिती होती.
हे पाठवण्यात आलेले साहीत्या भागिरथी परिवाराचे सदस्य अक्षय उंबरे, मयूर चालवते यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक १६/८/२०१९ रोजी पोहोचून हे सर्व साहीत्य जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना सुपूर्त केले. व अप्पर जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन भागीरथी परिवाराच्या सदस्यांनी ते साहीत्य एका दिवसामध्ये गरजू परिवारापर्यंत पोहोचवीण्याचे काम केले.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
0 टिप्पण्या