
दरम्यान, लातूर जिल्ह्यातलं सर्वात जास्त पाणी टंचाईग्रस्त मासुर्डी या गावाला राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांनी दत्तक घेतलं आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईनं होरपळनार्या लातूर जिल्ह्यातल्या 37 गावांनादेखील खासदार काकडे यांनी 50 लाखांचा निधी देण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता या गावांना दिलासा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातली पाणी टंचाई लक्ष्यात घेता राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांनी औसा तालुक्यातलं सर्वाधिक टंचाई ग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या तीन वर्षांपासून मासुर्डी या गावाची तहान टँकरवरच भागतेय. या गावात वीज आणि पाणी टंचाईनं कहर केला आहे. त्यामुळ खासदार काकडे यांनी हे गावच दत्तक घेतलंय आणि येत्या दोन वर्षात या गावाचा कायापालट करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.