
याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतविरोधी घोषणाबाजी करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसंच देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्यांना माफ केलं जाणार नाही, अशा कडक शब्दात राजनाथ यांनी ‘जेएनयू’मध्ये घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकरणाचा निषेध व्यक्त केला. या देशातील कोणताही नागरिक भारत मातेचा अपमान सहन करू शकत नाही. राष्ट्रविरोधी वक्तव्या करणाऱयांवर कारवाई व्हायलाच हवी, असं मत इराणी यांनी व्यक्त केलं आहे.