उजनी योजनेनंतर शहर झाले टँकरमुक्त...उजनी योजनेमुळे टँकरवरील कोट्यवधीचा खर्चही वाचला



गेल्या तीन वर्षातील टँकरची संख्या दर्शविणारा तक्ता शहरात तीन हजार कनेक्शनचे काम पूर्ण उजनी जलवाहिनीवरुन कनेक्शन देण्यात येत आहेत. शहरातून किमान १३ ते १४ हजार कनेक्शन देणे अपेक्षित आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आजघडीला हा आकडा ३ हजाराच्या आसपास पोहंचल्याचेही सांगण्यात आले.
गेल्या वर्षी टँकरवर २५ कोटींचा खर्च २0१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामध्ये उस्मानाबाद शहरात सर्वाधिक ९0 वर टँकर सुरु होते. आजूबाजूचे प्रकल्प कोरडेठाक पडल्याने शहराला चोराखळी प्रकल्पातून पाणी उचलले जात होते. त्या टँकर तब्बल २५ कोटी खर्च झाले होते. मात्र उजनी योजना तातडीने पूर्णत्वास नेल्याने सध्या शहर टँकरमुक्त आहे. त्यामुळे कोट्यावधीचा खर्च वाचला आहे. उस्मानाबाद : शहरामध्ये २0१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये असे वाटल्यावाचून राहत नाही. मात्र शहरामध्ये उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आणि टंचाईचा काळोख दूर झाला. २0 ते २५ दिवसाला मिळणारे पाणी आज चार दिवसाआड मिळू लागले आहे. हातलादेवीच्या पायथ्याशी नव्याने संपहाऊस उभारण्यात येणार आहे. सदरील यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर उस्मानाबादकरांना दररोज मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सदरील यंत्रणा अवघ्या येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल, असे नगराध्यक्ष सुनिल काकडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद शहरामध्ये २0१२-१३ यावर्षातील उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. शहराच्या आजूबाजूचे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. पालिकेच्या कुपनलिकांनीही दम तोडला होता. त्यामुळे शहरामध्ये पाण्याचे संकट अधिकच गंभीर बनले होते. शहरामध्ये तब्बल २0 ते २२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत होता. तोही अत्यल्प. खाजगी टँकरचे दरही गगनाला भिडले होते. ५00 लिटर पाण्यासाठी १00 ते १५0 रुपये मोजावे लागत होते. येथेही वेटींग असे. ही समस्या लक्षात घेवून नगर परिषदेने उजनी पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासाठी तातडीने प्रयत्न करुन शासनाकडे निधीची मागणी केली होती. तत्कालीन आघाडी शासनाने सढळ हाताने निधी दिला. आणि योजनेचे कामही युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे शहराची भीषण पाणी टंचाईच्या जोखडातून मुक्तता झाली. आजघडीला उस्मानाबादच्या जवळपास सर्वच भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. उजनी धरणातून प्रत्येक दिवशी ४0 ते ५0 लाख लिटर पाणी उचलले जात आहे.
दरम्यान, शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हातलादेवीच्या पायथ्याशी कायमस्वरुपी संपहाऊस उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंपाची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ टीएमसी पाणी उचलता येणार आहे. त्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे सांगण्यात येते. नगर परिषदेकडून संपहाऊस बांधकामासाठीची निविदा मागील काही दिवसापूर्वी काढण्यात आली असून, हे काम येत्या सहा महिन्यामध्ये पूर्णहोणे अपेक्षित आहे.
एकंदरीतच उजनी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर झाल्यामुळे आज उस्मानाबाद शहर १९एप्रिल २0१३रोजी टँकरमुक्त झाले.तेव्हापासून ते आजतागायत पालिका प्रशासनावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही.यामुळे कोट्यवधीचा खर्चही वाचला असल्याचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) उजनी योजनेनंतर शहर झाले टँकरमुक्त  हातला देवीच्या पायथ्याशी संपहाऊस उभारण्यात येत आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून, किमान सहा महिन्यामध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे पालिकेचे नगराध्यक्ष सुनिल काकडे यांनी सांगितले. ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील प्रभाग क्र. १ आणि २ या भागामध्ये अंतर्गत वाहिनीची कामे मागील काही महिन्यापूर्वी सुरु करण्यात आली होती. ती ९0 टक्क्यांपर्यंत उरकली आहेत. प्रभाग ३ मध्येही ६0 ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर प्रभाग ४ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील इतर व्यवस्थेची सर्वकामे येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण होतील, असे पालिकेचे गटनेते नंदू राजेनिंबाळकर यांनी सांगितले. योजनेपूर्वीशहरात होते ११0टँकर गेल्या तीन वर्षातील टँकरची संख्या दर्शविणारा तक्ता महिना २0१२ २0१३ १0१४